महावितरणने शेती पंपांची वीज तोडणी थांबवावी

‘स्वाभिमानी’ची मागणी; 24 रोजी आक्रोश आंदोलनाचा इशारा
Published:Feb 18, 2021 02:24 PM | Updated:Feb 18, 2021 02:24 PM
News By : Muktagiri Web Team
महावितरणने शेती पंपांची वीज तोडणी थांबवावी

सातारा जिल्ह्यात महावितरण कंपनीने शेतकर्‍यांकडून अन्यायकारक वीजबिल वसुली चालू केली आहे. ती तातडीने थांबवून हुकूमशाही पद्धतीने सुरू असलेली घरगुती तथा शेती पंपाची वीज तोडणी तातडीने थांबवावी, अन्यथा  आक्रोश आंदोलन तसेच रास्ता आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.