छत्रपती शिवाजी महाराजांनी समतेचे राज्य निर्माण केले

डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांचे प्रतिपादन : सावित्रीबाई फुले महिला कॉलेजमध्ये शिवजयंती साजरी
Published:Feb 19, 2021 09:41 AM | Updated:Feb 19, 2021 09:41 AM
News By : Muktagiri Web Team
छत्रपती शिवाजी महाराजांनी समतेचे राज्य निर्माण केले

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुभाव या तत्त्वांवर उभे होते आणि म्हणूनच जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी शिवइतिहास कोरला गेला,’ असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.