राऊतवाडी, ता. वाई येथील प्रगतशील शेतकरी मोहनराव साळुंखे यांच्या शेतात महाराष्ट्र शासनाच्या फळबाग योजनेतून 40 चिंचेची झाडे लावण्यात आली.
सातारारोड : राऊतवाडी, ता. वाई येथील प्रगतशील शेतकरी मोहनराव साळुंखे यांच्या शेतात महाराष्ट्र शासनाच्या फळबाग योजनेतून 40 चिंचेची झाडे लावण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष लक्ष घालून फळबाग योजना सुरू केली आहे. यामध्ये सर्व प्रकारची मदत शासन स्तरावर करण्यात येत आहे. याच योजनेतून राऊतवाडी, ता. वाई येथील प्रगतशील शेतकरी मोहनराव साळुंखे यांना 40 चिंचेची रोपे देण्यात आली.
राऊतवाडीच्या सरपंच रेखा जाधव यांच्या हस्ते ही चिंचेची रोपे मोहनराव साळुंखे यांना देण्यात आली.
यावेळी कृषी सहायक मालगाव अनंत गायकवाड, सुभाष जाधव, ग्रामसेवक अतुल डेरे, ह. भ. प. बबनराव कदम, आदर्श शिक्षक बबनराव जगताप, बाळासाहेब सकपाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.