दि. 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अभियाना’ची भुईंज येथील महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने ‘सायकल रॅली’ने सांगता करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी दै. ‘मुक्तागिरी’शी बोलताना दिली.
सातारा : दि. 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह अभियाना’ची भुईंज येथील महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने ‘सायकल रॅली’ने सांगता करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलीस केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी दै. ‘मुक्तागिरी’शी बोलताना दिली.
याबाबत अधिक माहिती देताना सपोनि दत्तात्रय गुरव म्हणाले, भुईंज येथील महामार्ग पोलीस केंद्र आणि सुभद्रा पेट्रोल पंप यांच्या संयुक्त विद्यमाने भुईंज- पाचवड-जोशिविहीर-बदेवाडी या मार्गावरून रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी सायकल रॅली काढण्यात आली. या सायकल रॅलीमध्ये भुईंज येथील सायकल वेडी ग्रुपचे सुमारे 70 ते 75 सायकल स्वार सपोनि दत्तात्रय गुरव, महामार्ग पोलीस केंद्राचे सर्व, अधिकारी, अंमलदार, कर्मचारी आणि सुभद्रा पेट्रोल पंपाचे मालक व्यवस्थापक आणि सर्व कर्मचारी सहभागी झाले होते. या सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकल वेडी ग्रुपच्या सर्व सदस्यांना मेडल्स भेट देऊन त्यांना गौरविण्यात आले.
सपोनि गुरव पुढे म्हणाले, मोटार वाहन अपघातास परिणामकारकरीत्या आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दरवर्षी देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.
रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभाग, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, शालेय शिक्षण विभाग व इतर संबंधित संस्था व संघटना यांच्या सहकार्याने रस्ता सुरक्षिततेसाठी जनजागृती व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.