‘जल जीवन मिशन’मध्ये जिल्ह्याची शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती

सीईओ विनय गौडा जीसी यांची माहिती
Published:Mar 22, 2021 12:44 PM | Updated:Mar 22, 2021 12:44 PM
News By : Muktagiri Web Team
‘जल जीवन मिशन’मध्ये जिल्ह्याची शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती

‘जन जीवनाशी अत्यंत महत्त्वाच्या पद्धतीने निगडित असलेल्या शासनाच्या ‘जल जीवन मिशन’मध्ये सातारा जिल्ह्याने 2020-21 मध्ये दिलेल्या उद्दिष्टानुसार 1 लाख 47 हजार 60 इतकी वैयक्तिक नळजोडणी पूर्ण करून शंभर टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे,’ अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जीसी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.