छ. शिवाजी महाराजांनी समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली

सुरेश पवार यांचे प्रतिपादन : छ. शिवाजी कॉलेजमध्ये ऑनलाइन व्याख्यान संपन्न
Published:Feb 21, 2021 11:13 AM | Updated:Feb 21, 2021 11:13 AM
News By : Muktagiri Web Team
छ. शिवाजी महाराजांनी समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली

‘मध्ययुगीन काळात अनेक सत्तांनी अनियंत्रित राजेशाहींचा अवलंब केला असताना शिवाजी महाराजांनी कल्याणकारी राजेशाहीचा अवलंब केला. शिवकाळातील राजकारण हे समाजहितासाठी होते. जनतेच्या अडचणी सोडविणे त्यांना वेळेत न्याय मिळवून देणे, या गोष्टी महाराज स्वतःचे आद्यकर्तव्य समजत होते. शिवाजी महाराज म्हणजे भविष्याचा वेध घेणारे एक महान असे कर्मयोगी राजे होते. समाज परिवर्तनाची मुहूर्तमेढ महाराजांनी अंधकारमय समजल्या जाणार्‍या मध्ययुगातच रोवली ही गोष्ट नक्कीच आजच्या राजकारणाला, सत्तेलाही मार्गदर्शक ठरावी अशीच आहे,’ अ