लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीजबिले तातडीने माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता फलटण-लोणंद रोड राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात व ऊर्जा मंत्री तसेच सरकारचा रस्ता रोको करून जाहीर निषेध केला.
फलटण : लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीजबिले तातडीने माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. 19 रोजी सकाळी 10 वाजता फलटण-लोणंद रोड राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात व ऊर्जा मंत्री तसेच सरकारचा रस्ता रोको करून जाहीर निषेध केला.
गेल्या वर्षापासून लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करा, अशी मागणी करत आहोत. मात्र, राज्य सरकार झोपेचे सोंग घेत आहे. कोरोनाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. मंत्र्यांचे बंगले सजवायला यांच्याकडे पैसे आहेत. मात्र, सर्वसामान्यांना वीजबिलात सवलत द्यायला पैसे नाहीत.
लॉकडाऊनची भीती घालून आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा राज्यभर तीव्र पडसाद उमटतील, असा इशाराही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला तसेच महावितरणने घरगुती व कृषीपंप वीज तोडणी थांबवावी नाहीतर संघर्ष अटळ आहे.
यावेळी धनंजय महामुलकर, डॉ. रवींद्र घाडगे, सचिन खानविलकर, प्रमोद गाडे, दादा जाधव, सुभाष जाधव, बाळासाहेब शिपकुले, रोहन मोहिते, सचिन बारगळे, विक्रम धायगुडे, रोहन चव्हाण, अजित जाधव, उमेश घाडगे, परेश बोडरे, अक्षय लोंढे, निखिल नाळे, प्रल्हाद अहिवळे, मधुकर गाढवे, विश्वनाथ यादव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.