फलटण तालुक्यात पावसामुळे बाजरीसह ऊस पीक भुईसपाट

नुकसान भरपाई देण्याची शेतकर्‍यांची मागणी
Published:Sep 09, 2020 02:46 PM | Updated:Sep 09, 2020 02:46 PM
News By : Muktagiri Web Team
फलटण तालुक्यात पावसामुळे बाजरीसह ऊस पीक भुईसपाट

फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्‍यांची त्रेधातिरपीट उडाली. हातातोंडाशी आलेल्या ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने यावर्षी शेतकर्‍याच्या उसाचा तोटा मोठ्या प्रमाणात होणार, त्यामुळे संबंधित विभागाने झालेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.