येत्या शुक्रवारी, १४ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांशी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी संपर्क साधला आणि त्यांचे मन वळविलं. परिणामी, पायलट समर्थक आमदार हॉटेल सोडून निघून जाऊ लागले आणि पायलट एकाकी पडले. त्यामुळे पायलट यांनीही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधायला सुरुवात केली.
जयपूर : गेल्या महिन्यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरुद्ध बंडाचा झेंडा फडकवून उपमुख्यमंत्रिपद तसंच राजस्थान प्रदेश काँग्रेसचं अध्यक्षपद गमावणारे सचिन पायलट यांना एकाकी पडल्यामुळं नमतं घ्यावं लागलं. सर्व समर्थक बंडखोर आमदार पायलट यांना सोडून गेल्यामुळे 'घरवापसी'शिवाय पर्याय नसलेल्या पायलट यांनी सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तसंच राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांची भेट घेतली. सचिन पायलट यांची बंडखोरी मोडीत निघाल्यामुळे राजस्थानात गहलोत सरकारवर समोरचं राजकीय संकटही आता संपल्यात जमा आहे. परंतु, गांधी कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पायलट यांची नाराजी दूर झाली असली तरी अशोक गेहलोत गटाचे आमदार मात्र यामुळे चांगलेच संतापलेत. सोमवारी रात्रीपासून हे आमदार मुख्यमंत्र्यंना जैसलमेरला बोलावण्याची मागणी करत आहेत.पायलट गटाची 'घरवापसी'
गेहलोत गटाचे आमदार सध्या जेसलमेरच्या एका हॉटेलमध्ये आहेत. ज्यांच्यामुळे गेहलोत सरकारवर तोंडावर पडायची वेळ आली त्यांच्या काँग्रेसमध्ये परतण्याच्या बातमीनं हे आमदार मात्र नाराज झालेत. गेल्या रविवारी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या जवळच्या आणि कॅबिनेट मंत्र्यांनी बंडखोर आमदारांना पक्षात परत घेतलं जाऊ नये, अशी इच्छा व्यक्त केली होती. परंतु, सोमवारी पायलट - गांधी कुटुंबीयांची भेट झाली आणि सगळा घटनाक्रमच बदलला.
गेहलोत गट नाराज
गेहलोत गटाच्या आमदारांची मागणी प्रभारी अविनाश पांडे आणि राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवली. पायलट गटाच्या घरवापसीमुळे जैसलमेरमध्ये आमदारांत नाराजी पसरल्याचंही त्यांनी सांगितलंय. आता या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, संसदीय कार्यमंत्री शांती धारीवाल, संयम लोढा आणि महेंद्र चौधरी जैसलमेरला दाखल होत आहेत. पायलट गटाचे आमदारही दिल्लीहून सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत जयपूरला पोहचणार असल्याचं सांगण्यात येतंय.
येत्या शुक्रवारी, १४ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनापूर्वी सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांशी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी संपर्क साधला आणि त्यांचे मन वळविलं. परिणामी, पायलट समर्थक आमदार हॉटेल सोडून निघून जाऊ लागले आणि पायलट एकाकी पडले. त्यामुळे पायलट यांनीही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधायला सुरुवात केली. पायलट यांचे सर्वात मोठे समर्थक मानले जाणारे आमदार भंवरलाल शर्मा आणि विश्वेंद्र सिंह यांनी सोमवारी मुख्यमंत्री गहलोत यांची भेट घेऊन त्यांच्याविरुद्ध ३२ दिवसांपासून सुरू असलेली बंडखोरी फसल्याचे जाहीर संकेत दिले. सोमवारी राहुल-प्रियांका यांना भेटण्यापूर्वी सचिन पायलट यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व कोषाध्यक्ष अहमद पटेल तसेच पक्षाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाळ यांच्या भेटी घेऊन चर्चा केल्याचंही समजतंय. समजते.