विहिरीत पडलेल्या सांबरचे रेस्क्यु ऑपरेशन करून प्राण वाचवण्यात आले आहेत. सातारा तालुक्यातील निगडीत येथे शनिवारी रात्री ही घटना घडली असून तब्बल सहा तासाच्या थरारानंतर वनविभागाला यश आले.
सातारा तालुक्यातील निगडी येथील विहिरीत शनिवारी रात्री 7.30 ची सांबर पडले असल्याची फोनद्वारे डॉ. निवृत्ती चव्हाण वनक्षेत्रपाल, सातारा यांस खबर मिळाली. सातारा वनपरिक्षेत्रचे कर्मचारी सांबर रेस्क्यु करिता साहित्य जुळवाजुळवीच्या तयारीला लागले. 8.15 ला घटनास्थळी वनपथक दाखल झाले. सोबत पशु वैद्यकीय तज्ञ डॉ. चंदन सावने हे देखील होते. घटनास्थळी पोहोचल्यावर एकंदर परिस्थितीचा अंदाज घेतला. सांबर कशामुळे विहिरीत पडले या कारणांचा काही उलगडा होत नव्हता. कार्यवाहीला सुरुवात झाली. वनरक्षक राजू मोसलगी विहिरीत उतरण्याच्या तयारीत होता. सांबरास ज्या पायाडाने वर घेण्याचे होते त्याकरिता ची तयारी म्हणून...साधारण 9.30 वाजेपर्यंत सांबरास विहिरी बाहेर काढण्यात पथक यशस्वी झाले. खूपच घाबरलेलं आणि भेदरलेल्या अवस्थेत होतं. त्यास थोडं शांत केलं. अंगावर उबदार कपडे टाकून विहिरीमध्ये झटापटीत झालेल्या जखमांवर औषधोपचार केले. अगदी रात्री 12.30 पर्यंत सांबर एकाच ठिकाणी शांतपणे बसून होतं. चारा टाकलेला होताच..पहाटेपर्यंत ते या चार्यावर ताव मारत होतं. बचाव पथकातील सर्वजण हे दुरून शांतपणे पाहत होते. सर्व परिस्थिती नियंत्रणात होती. पहाटे तीन वाजता ते अगदी चांगलंच हुश्शार झालं... आणि बघता बघता अगदी दोनच उड्यामध्ये अधिवासामध्ये पसार झाल.