शेतक-यांवरील गुन्हे मागे घ्या : खा.श्रीनिवास पाटील लोकसभा सभागृहात सरकारचे लक्ष वेधले

Published:Feb 05, 2021 09:01 AM | Updated:Feb 05, 2021 09:01 AM
News By : Muktagiri Web Team
शेतक-यांवरील गुन्हे मागे घ्या : खा.श्रीनिवास पाटील लोकसभा सभागृहात सरकारचे लक्ष वेधले

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी विरोधी खासदारांनी लोकसभेच्या सभागृहात गुरूवारी केली. यामध्ये साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुध्दा अन्य सहका-यांसोबत सहभाग नोंदवत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. हे गुन्हे मागे घ्या असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन व काळा मास्क घालून त्यांनी ही मागणी केली.