खटाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या आरोपीस तत्काळ अटक करून प्रकरण दडपणार्या अधिकारी आणि राजकीय पुढार्यावर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी आज जनता क्रांती दलाने केली आहे. याबाबत आज खटाव तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. तसेच 26 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
वडूज : खटाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या आरोपीस तत्काळ अटक करून प्रकरण दडपणार्या अधिकारी आणि राजकीय पुढार्यावर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी आज जनता क्रांती दलाने केली आहे. याबाबत आज खटाव तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. तसेच 26 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी जनता क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष अनिल लोंढे, दत्ता केंगार, आनंद साठे, श्रीकांत रजपूत, राजेंद्र भोसले, आरपीआयचे गणेश भोसले, बाबा बडेकर आदी पदाधिकार्यांनी आज तहसीलदारांना निवेदन दिले.
या निवेदनातील अधिक माहिती अशी की, पीडितेची आई ही भांडी घासण्याचे काम करीत आपला उदरनिर्वाह करीत आहे. काही दिवसांपूर्वी रात्री 11 ते 11:30च्या सुमारास आई व मुलगी काम करीत असताना गावातील साहिल उर्फ नोन्या आतार याने पीडित अल्पवयीन एकटी असल्याचे पाहून त्याने तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रकार केला. हा प्रकार आईला सांगताच आईने आरडाओरडा केला दरम्यान, संबंधित आरोपीने तेथून पळ काढला.
दुसर्या दिवशी पीडित अल्पवयीन मुलीला त्रास होऊ लागल्यानंतर तिला पीडितेच्या आईने कराड येथील एका रुग्णालयात दाखल केले. संबंधित डॉक्टरांनी झालेल्या प्रकाराबाबत शहानिशा करून वैद्यकीय अहवाल औंध पोलीस ठाण्यास पाठवला. परंतु औंध पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सोमदे यांनी सदरच्या पीडितेची घरची परिस्थिती पाहून झालेल्या गंभीर घटनेला महत्त्व न देता आरोपीच्या बाजूने राजकीय लोकांच्या विचाराने संबंधित आरोपीला वाचवण्याचा खटाटोप सुरू केला आहे.
महिला दिनादिवशीच अल्पवयीन पीडितेस सार्वजनिक ठिकाणी बोलावून तिच्यावर झालेल्या प्रकाराबाबत तिला अश्लील प्रश्न विचारून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. घटना गंभीर असताना ही आरोपीला अटक न करता अल्पवयीन पीडित व तिच्या आईवर दबाव टाकण्याचा प्रकार करीत आहेत. ही बाब गंभीर स्वरूपाची असून, आरोपीला साथ देणार्यांना ही सहआरोपी करावे. तसेच पोलीस उपनिरीक्षक सोमदे या कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्यावर ही कायदेशीर कारवाई करावी. संबंधित पीडित कुटुंब हे भयभीत झाले असून, त्यांना संरक्षण व आर्थिक मदत देऊन त्यांची समाज कल्याण खात्याने जबाबदारी घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
अन्यथा 26 मार्च रोजी जनता क्रांती दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा ही निवेदनात दिला आहे.