कवी यशवंत यांच्या लेखनावर समीक्षा होणे गरजेचे 

डॉ. रणधीर शिंदे यांचे मत : मसाप, शाहूपुरी शाखेतर्फे मराठी भाषा पंधरवडा ऑनलाईन संपन्न
Published:Mar 02, 2021 09:16 AM | Updated:Mar 02, 2021 09:16 AM
News By : Muktagiri Web Team
कवी यशवंत यांच्या लेखनावर समीक्षा होणे गरजेचे 

‘सातारा जिल्ह्यातील तारळे येथील कवी यशवंत हे थोर कवी होते. त्यांच्या लेखनामध्ये विविधता होती. त्यांनी विपुल प्रमाणात आणि दीर्घ लेखन केले. त्यांना विविध पुरस्कार आणि सन्मान मिळाले. त्यांच्या लेखनामध्ये कमालीची विविधता होती. कथा, कविता, जातपत कविता, विडंबन कविता, बालकविता, प्रासंगिक, कथात्मक, अनुवाद, व्यासपीठ कविता असे त्यांच्या लेखनाचे वैविध्य होते. नवीन पिढीला त्यांच्या लेखनाबद्दल माहिती व्हावी, यासाठी त्यांच्या लेखनावर समीक्षा होणे गरजेचे आहे,’ असे मत शिवाजी विद्यापीठच्या मराठी अधिविभागाचे प्रम