‘सातारा जिल्ह्यातील तारळे येथील कवी यशवंत हे थोर कवी होते. त्यांच्या लेखनामध्ये विविधता होती. त्यांनी विपुल प्रमाणात आणि दीर्घ लेखन केले. त्यांना विविध पुरस्कार आणि सन्मान मिळाले. त्यांच्या लेखनामध्ये कमालीची विविधता होती. कथा, कविता, जातपत कविता, विडंबन कविता, बालकविता, प्रासंगिक, कथात्मक, अनुवाद, व्यासपीठ कविता असे त्यांच्या लेखनाचे वैविध्य होते. नवीन पिढीला त्यांच्या लेखनाबद्दल माहिती व्हावी, यासाठी त्यांच्या लेखनावर समीक्षा होणे गरजेचे आहे,’ असे मत शिवाजी विद्यापीठच्या मराठी अधिविभागाचे प्रम
सातारा : ‘सातारा जिल्ह्यातील तारळे येथील कवी यशवंत हे थोर कवी होते. त्यांच्या लेखनामध्ये विविधता होती. त्यांनी विपुल प्रमाणात आणि दीर्घ लेखन केले. त्यांना विविध पुरस्कार आणि सन्मान मिळाले. त्यांच्या लेखनामध्ये कमालीची विविधता होती. कथा, कविता, जातपत कविता, विडंबन कविता, बालकविता, प्रासंगिक, कथात्मक, अनुवाद, व्यासपीठ कविता असे त्यांच्या लेखनाचे वैविध्य होते. नवीन पिढीला त्यांच्या लेखनाबद्दल माहिती व्हावी, यासाठी त्यांच्या लेखनावर समीक्षा होणे गरजेचे आहे,’ असे मत शिवाजी विद्यापीठच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी व्यक्त केले.
मसाप, शाहूपुरी शाखा आयोजित नवव्या मराठी भाषा पंधरवड्याच्या ऑनलाइन व्याख्यानात ‘कवी यशवंत यांची कविता’ या विषयावर ते बोलत होते.
डॉ. शिंदे म्हणाले, ‘कवी यशवंत यांचे नाव यशवंत पेंढरकर होते, ते सातारा जिल्ह्यातील तारळे गावातील होते. त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले; परंतु त्यांच्याबद्दल फार त्रोटक माहिती उपलब्ध आहे. ते राजकवी म्हणून बडोद्याला होते. रविकिरण मंडळातील ते एक महत्त्वाचे कवी होते. येरवडा येथे ते कारकून होते. 1950 च्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 16 कवितासंग्रह त्यांनी लिहिले. त्यांच्या लेखनात कमालीची विविधता होती. त्यांनी विविध प्रकारच्या कविता लिहिल्या. मराठी कविता सर्वदूर पोहोचवण्याचे श्रेय रविकिरण मंडळाला जाते, या मंडळातील ते महत्वाचे कवि होते. त्यांच्या कवितांमध्ये नाद सौंदर्य, ध्वनी सौंदर्य होते. त्यांच्या कविता ऐकणे मोठा आनंद आहे.’
कवी यशवंत यांनी मानववाद, सामाजिक जाणिवा संदर्भ, सामाजिक सुधारणा, बालगुन्हेगारी, नैसर्गिक आपत्ती, तात्कालिक अशा कविता लिहिल्या. तसेच महाराष्ट्र गीत, इतिहासविषयक दृष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांवरील महाकाव्य असे ऐतिहासिक लेखनही त्यांनी केले. मराठीमध्ये आईविषयक अनेक कविता आहे, परंतु त्यांनी 1921 साली लिहिलेली ‘आई’ या कविताचा प्रत्येकावर परिणाम झाला, असे मतही डॉ. शिंदे यांनी व्यक्त केले.
मसाप शाहूपुरी शाखेचे मार्गदर्शक किशोर बेडकिहाळ यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी शाखेच्या कार्याबद्दल माहिती देत प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच कोरोनामुळे मराठी भाषा पंधरवडा ऑनलाइन घेत संपन्न झाल्याचे सांगितले.
गेल्या वर्षी कोरोनामुळे शाखेच्या विविध कार्यक्रमात खंड पडला असला तरी येत्या काळात ऑनलाइनच्या माध्यमातून ते घेण्यात येतील, असे सांगितले. या ऑनलाइन व्याख्यानात मसाप शाहूपुरी शाखेचे पदाधिकारी, सदस्य आणि साहित्यप्रेमी सहभागी झाले होते.