नीरा खो-यातील नीरा देवघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन - तीन दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. तर भाटघर, गुंजवणी व वीर धरणांच्या
पाणलोट क्षेञात गुरूवारी ( दि.३०) सायंकाळपासून कमी - अधिक प्रमाणात संततधार पाऊस पडत असल्याने नीरा खो-यातील चारही धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे चारही धरणांत शुक्रवारी ( दि.३१) सायंकाळी चार वाजता ४६.२८० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाल्याने चारही धरणे ९५.७६ टक्के भरली आहेत. दरम्यान, येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर कायम राहिल्यास नीरा खो-यातील चारही धरणे १०० टक्के भरतील. तर वीर धरणातून नीरा नदीत ६४ हजार ५२३ क्युसेक्सने विसर्ग सुरू असल्याने नीरा नदीला तिस-यांदा महापुर आल्याने नीरा नदी काठावरील प्रसिद्ध दत्त मंदीरात पाणी गेले आहे.तर ब्रिटीशकालीन पुल पाण्याखाली गेला आहे.
नीरा खो-यातील नीरा देवघर, भाटघर , गुंजवणी
धरणाच्या पाणलोट क्षेञात गेल्या दोन - तीन
दिवसां पासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने नीरा देवघर व वीर धरण १०० टक्यांपर्यंत पोहोचले असून भाटघर व गुंजवणी धरण एक - दोन दिवसांत १०० टक्के ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहेत.
शुक्रवारी (दि.३१) सायंकाळी चार वाजता
भाटघर धरणाच्या परिसरात दिवसभरात ७१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून धरणांत २१.९८० टी.एम.सी.पाणीसाठा उपलब्ध झाल्याने भाटघर धरण ९३.५२ टक्के भरले आहे. सायंकाळी पाच वाजता धरणाच्या विद्युतगृहातून १ हजार ६३१ क्युसेक्सने विसर्ग नीरा नदीत सुरू आहे.
नीरा देवघर धरणाच्या परिसरात शुक्रवारी दिवसभरात ८१ मि.मी पावसाची नोंद झाली असून
धरणांत ११.५२८ टी.एम.सी.पाणीसाठा उपलब्ध झाल्याने नीरा देवघर धरण ९७.४२ टक्के भरले आहे.
नीरा देवघर धरणाच्या पाच दरवाजातून शुक्रवारी ( दि.३१) सकाळी ११.३० वाजलेपासून १५ हजार ६२४ क्युसेक्सने व विद्युतगृहातून ७५० क्युसेक्स असा एकुण १६ हजार ३७४ क्युसेक्सने विसर्ग नीरा नदीत सुरू आहे.
गुंजवणी धरणाच्या परिसरात शुक्रवारी दिवसभरात ७० मि.मी पावसाची नोंद झाली असून
धरणांत ३.३६३ टी.एम.सी.पाणीसाठा उपलब्ध झाल्याने नीरा देवघर धरण ९१.१६ टक्के भरले आहे.
गुंजवणी धरणाच्या दरवाजातून शुक्रवारी (दि.३१) सकाळी २.३० वाजलेपासून २ हजार ७११ क्युसेक्सने व विद्युतगृहातून २५० क्युसेक्स असा एकुण २ हजार ९६१ क्युसेक्सने विसर्ग नीरा नदीत सुरू आहे.