विशेष बाब : नगराध्यक्षांच्या मागणीला पालकमंत्र्यांची मंजुरी लोणंद नगराध्यक्ष मधुमती गालिंदे यांनी पालखी सोहळ्यामुळे नगरपंचायतीवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार लक्षात घेता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली. या मागणीची तात्काळ सकारात्मक दखल घेत पालकमंत्री देसाई यांनी लोणंद नगरपंचायतीला विशेष अनुदान मंजूर करण्यास सहमती दर्शवत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या विविध नागरी सुविधांसाठी आर्थिक
लोणंद, दि. १२ (प्रतिनिधी) :
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा–२०२६ च्या पार्श्वभूमीवर लोणंद पालखी तळ आयोजित आढावा दौरा नामदार मकरंद आबा पाटील यांनी पालखी सोहळ्याच्या तयारीचा सविस्तर आढावा घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. "पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या श्रद्धेचा आणि परंपरेचा सोहळा असून, कोणत्याही वारकरी किंवा भाविकाची गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे," असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
बैठकीस दिल्या.यावेळी प्रांताधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, दयानंद खरात, नगराध्यक्ष मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी, शिवाजीराव शेळके-पाटील, भरत शेळके, सचिन शेळके, भरत बोडरे, सागर शेळके, राहुल घाडगे, असगर इनामदार, अॅड. गणेश शेळके, वैभव खरात, सागर गालिंदे, अॅड. गजेंद्र मुसळे तसेच सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यंदा १५ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद पालखीतळावर मुक्कामी येणार असल्याने पालखीतळ, दिंडी विसावा स्थळे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सेवा, वीजपुरवठा, वाहतूक नियोजन व सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नीरा दत्त घाटावरील स्नान सोहळ्यासाठी अतिरिक्त बॅरिकेड्स उभारणे, सर्पमित्रांची नियुक्ती करणे तसेच गर्दी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
वारकऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात सुलभ शौचालये, पिण्याच्या पाण्याचे टँकर, अखंडित वीज व पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला. तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी आवश्यक परवानग्या घेऊनच व्यवसाय करावा आणि अन्नाच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करण्यात यावी, असे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले.
याशिवाय पालखी मार्गावरील तसेच पुणे–सातारा महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविणे, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध ठिकाणी एसटी बस पार्किंगची व्यवस्था करणे आणि पालखी सोहळा सुरक्षित, शिस्तबद्ध व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्याच्या सूचना नामदार मकरंद आबा पाटील यांनी