‘समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन विकासकाम करण्याचे महाविकास आघाडी शासनाचे धोरण आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील रखडलेल्या कामास गती देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम करणार्या प्रत्येकाला मान-सन्मानाने वागविले जाईल,’ असे ठोस प्रतिपादन सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
निमसोड : ‘समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन विकासकाम करण्याचे महाविकास आघाडी शासनाचे धोरण आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील रखडलेल्या कामास गती देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम करणार्या प्रत्येकाला मान-सन्मानाने वागविले जाईल,’ असे ठोस प्रतिपादन सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
गुरसाळे (ता. खटाव) येथे नागरी सत्कार व पक्ष प्रवेश समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार प्रभाकर घार्गे, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी सभापती संदीप मांडवे, प्रा. बंडा गोडसे, अॅड. विलासराव इंगळे, सी. एम. पाटील, शिवाजीराव सर्वगोड, प्रतीक विधाते, जयदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. पाटील म्हणाले, ‘राज्य शासन चालविताना कोणताही दुजाभाव केला जात नाही. साखर कारखान्यांना थकहमी देताना पक्ष गटा-तटाचा विचार केला नाही. विविध कारखान्यांना 516 कोटींची थकहमी राज्य शासनाने बँकांना दिली आहे. साखर कारखानदारांच्या माध्यमातून शेतकर्यांच्या अर्थकारणाला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल. गुरसाळे परिसरातील रस्ते, आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासंदर्भात नजीकच्या काळात ठोस भूमिका घेतली जाईल.’
प्रभाकर घार्गे म्हणाले, ‘ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी शासनातील घटक पक्ष विरोधक म्हणून समोर असणार आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण विचार करून निवडणुकी लढवाव्यात. प्रभाकर देशमुख यांनी भाषणात येरळवाडी धरण परिसरात अभयारण्य केल्यास शेतकरी वर्गावर त्याचे गंभीर परिणाम होणार असल्याचा धोका व्यक्त केला.’ संदीप मांडवे यांनी कोरोना संसर्गजन्य आजारात गुरसाळे ग्रामस्थांना राष्ट्रवादी काँग्रेस व व्यक्तिगत स्वरूपात केलेल्या सहकार्याचा ऊहापोह केला.
या कार्यक्रमास अंबवडे सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय पवार, माजी सरपंच देविदास पवार, सुखदेव पवार, शशिकांत जाधव, बाळासाहेब पोळ, शांताराम पवार, साहेबराव पाटोळे, खुदबुद्दीन शिकलगार, शिवाजी जाधव, मारुती जाधव, प्रशांत वाघ, महादेव जाधव, विष्णू मांडके, बाजीराव जाधव, संतोष जाधव, भानुदास जाधव, मयुरी जाधव-पाटील, पीएसआय सोनाली कदम, धनंजय जाधव, हणमंत जाधव, हसन शिकलगार, धोंडिराम जाधव, विश्वास जाधव, मकरंद जाधव, रोहन जाधव, किसन जाधव, चाँद शिकलगार, अॅड. सारंग वाघ, डॉ. जाधव, संजय जाधव, महेश वाघ तसेच ज्येष्ठ ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.
बळीराम वाघ यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ कार्यकर्ते बबनराव मांडके, विष्णूभाऊ जाधव, प्रतापराव जाधव यांनी स्वागत केले.
मान्यवरांचा राष्ट्रवादीत प्रवेश
गुरसाळे येथील कार्यक्रमात माजी उपसरपंच खुदबुद्दीन शिकलगार, तंटामुक्तीचे अध्यक्ष साहेबराव पाटोळे, विश्वास जाधव, बाजीराव जाधव, विष्णू मांडके आदींसह गाव पातळीवरील अनेक मान्यवर कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.