पाचगणीत जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती; हजारो लिटर पाणी वाया

Published:Mar 20, 2021 10:54 AM | Updated:Mar 20, 2021 10:54 AM
News By : Muktagiri Web Team
 पाचगणीत जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीला गळती; हजारो लिटर पाणी वाया

पर्यटननगरी पाचगणी (ता. महाबळेश्‍वर) येथील जीवन प्राधिकरणाच्या जलवाहिनीतून अनेक ठिकाणी गळती सुरू असून हजारो लिटर पाणी रस्त्यालगतच्या गटारातून वाहून जात आहे. नागरिकांच्या दृष्टीने पाणी महत्त्वाचे असलेतरी जीवन प्राधिकरणाच्या बेजबाबदार मस्तवाल अधिकार्‍याला पाण्याचे महत्त्व नाही. अधिकार्‍याच्या हलगर्जीपणामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याच्या समस्येमुळे पाचगणीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे.