भिलारमध्ये ‘जनता कर्फ्यू’स नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Published:Apr 18, 2021 01:21 PM | Updated:Apr 18, 2021 01:21 PM
News By : Muktagiri Web Team
भिलारमध्ये ‘जनता कर्फ्यू’स नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुस्तकांचे गाव म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या भिलार गावात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी भिलार ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने शुक्रवार, दि. 16 एप्रिल ते मंगळवार, दि. 27 एप्रिलपर्यंत दहा दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला असून, या पाठोपाठ तालुक्याच्या पूर्व भागातील गोडवली, खिंगर, आंब्रळ व राजपुरी या चार गावांतील ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने दि. 19 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ जाहीर केला आहे.