सह्याद्रि' कडून २६.४० कोटींचे ऊस बील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा
Published:8 m 10 hrs 30 min 18 sec ago | Updated:8 m 10 hrs 30 min 18 sec ago
News By : Muktagiri Web Team
कारखान्याने पहिल्या पंधरवड्यात आलेल्या ऊसापोटी प्रति मे टन रूपये ३५००/- प्रमाणे एकूण रूपये २६ कोटी ४० लाख ऊस उत्पादक शेतक-याच्या बँक खात्यामध्ये जमा केल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. 'सह्याद्रि'ने नेहमीची रास्त भाव देण्याची परंपरा याही गळीत हगामात जोपासलेली आहे. ऊसाच्या बिलाची रक्कम जमा झाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळालेला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व उस उत्पादक शेतक-यानी त्यानी पिकविलेला सर्व ऊस सह्याद्रि कारखान्याकडे गळीतास पाठवून जास्तीत जास्त ऊस गळीत होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन श्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. 'सह्याद्रि'चे चेअरमन माजी मंत्री श्री बाळासाहेब पाटीत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची यशस्वी वाटचाल सरू आहे.