बोंडारवाडी धरणाबाबत त्वरित निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करणार 

उषा उंबरकर यांचा इशारा : पाण्यावाचून मेढा-केळघर भागाची दुर्दशा
Published:2 y 11 m 1 d 7 hrs 13 min 37 sec ago | Updated:2 y 11 m 1 d 7 hrs 13 min 37 sec ago
News By : Muktagiri Web Team
बोंडारवाडी धरणाबाबत त्वरित निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करणार 

मेढा-केळघर भागातील कण्हेर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांची पाण्याअभावी दैना झाली असून, 1991 पासूनच्या तीन दशकात या भागातून मोठ्या प्रमाणावर शहरात स्थलांतर होत आहे. बर्‍याच प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडल्या असून, केडंबे येथील हायस्कूल सुद्धा बंद पडले आहे. 60 ते 70 टक्क्यांच्यावर शेती पाणी नसल्यामुळे पडून आहे. जावली तालुका दूध पुरवठा संघ 10 वर्षांपूर्वीच बंद पडला असून, भागातील दुग्धव्यवसाय पूर्णपणे संपलाय. पाण्याअभावी कुठलाच जोडधंदा करणे शक्य नाही. त्यामुळे तरुण वर्ग शहरात स्थलांतरित