संततधार पावसामुळे महाबळेश्‍वर तालुक्यातील खरीप पिकांचे नुकसान

शेतकरी आर्थिक अडचणीत; पिकांची नुकसान भरपाई देण्याची मागणी 
Published:Aug 18, 2020 01:11 PM | Updated:Aug 18, 2020 01:11 PM
News By : Muktagiri Web Team
संततधार पावसामुळे महाबळेश्‍वर तालुक्यातील खरीप पिकांचे नुकसान

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे महाबळेश्‍वर तालुक्यातील खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊ लागले आहे. सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्यामुळे येथील पिके कुजू लागली आहेत. यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील खरीप हंगाम धोक्यात आल्यामुळे कोरोनाच्या महामारीत विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या शेतकर्‍यांच्या आर्थिक अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे संबंधित विभागाने पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.