छ. शिवरायांचा विचार म. फुल्यांनी रुजवला

साहित्यिक अरुण जावळे यांचे प्रतिपादन
Published:Feb 22, 2021 10:05 AM | Updated:Feb 22, 2021 10:05 AM
News By : Muktagiri Web Team
छ. शिवरायांचा विचार म. फुल्यांनी रुजवला

छत्रपती शिवरायांचा इतिहास उजेडात आणण्याबरोबरच त्यांचा मानवी कल्याणाचा विचार महात्मा जोतिराव फुल्यांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. रायगडावरील छत्रपतींची समाधी शोधून जगातील पहिली जयंती त्यांनी साजरी केली. शिवरायांवरील पहिला पोवाडाही म. फुल्यांनी लिहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहिताना पत्राची सुरुवात जयशिवराय या शब्दाने करत असत. त्यामुळे छ. शिवराय समजून घ्यायचे असतील तर म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधी वाचले पाहिजेत,’ असे प्रतिपादन साहित्यिक अरुण जावळे यांनी केले.