शेतकर्‍यांच्या हाती आणेवारी नोंद केलेला सातबारा द्यावा अन्यथा आंदोलन सुरूच ठेवणार

डॉ. भारत पाटणकर यांचा निवेदनाद्वारे इशारा
Published:Feb 21, 2021 01:03 PM | Updated:Feb 21, 2021 01:03 PM
News By : Muktagiri Web Team
शेतकर्‍यांच्या हाती आणेवारी नोंद केलेला सातबारा द्यावा अन्यथा आंदोलन सुरूच ठेवणार

‘सुमारे दीडशे वर्षापूर्वी पासून कब्जे वहिवाटीत व स्वत: कसत असलेल्या कूळ शेतकर्‍यांची मालक सदरी नावे व आणेवारी नोंद केलेला सातबारा त्यांच्या हाती दिला जात नाही, तोपर्यंत शेतकरी प्रांत कार्यालया समोरील ठिय्या आंदोलन थांबविणार नाहीत,’ असा इशारा डॉ. भारत पाटणकर निवेदनाद्वारे दिला आहे.