कोरोना काळातील कृषिपंपाची वाढीव बिले कमी करावीत

‘कोरेगाव शहर विकास मंच’ची वीजवितरणकडे निवेदनाद्वारे मागणी
Published:Feb 25, 2021 09:26 AM | Updated:Feb 25, 2021 09:26 AM
News By : Muktagiri Web Team
कोरोना काळातील कृषिपंपाची वाढीव बिले कमी करावीत

गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला असून, दरम्यानच्या काळात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे सर्व उद्योग-धंदे बंद पडले. सर्वांवर उपासमारीची वेळ आली. यात शेतकर्‍याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यानच्या काळात वीजवितरणकडून भरमसाठ रकमेने वीजबिल व कृषिपंपाच्या बिलांचे वितरण करण्यात आले. पण लॉकडाऊनच्या झळा सोसलेल्या शेतकर्‍याला ही भरमसाठ कृषिपंप बिले भरणे शक्य नाही, तरी शेतकर्‍यांची परिस्थिती पाहून वीज वितरणने कृषिपंपाची बिले कमी करावीत, अशी