खटाव तालुक्यातील प्रमुख प्रश्‍न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार

प्रदीप विधाते यांची ग्वाही : खटाव-भराडे वस्ती, धकटवाडी, सिद्धेश्‍वर कुरोली रस्त्यांचे भूमिपूजन
Published:Mar 08, 2021 11:50 AM | Updated:Mar 08, 2021 11:50 AM
News By : Muktagiri Web Team
खटाव तालुक्यातील प्रमुख प्रश्‍न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार

‘कोरोना काळातील विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी तसेच विविध रस्ते मार्गी लागावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच खटावला जोडणार्‍या विविध रस्त्यांसाठी कोटींचा निधी मिळाला आहे. यापुढील काळातही प्रमुख प्रश्‍न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे,’ अशी ग्वाही जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिली.