सातारा जिल्ह्यातील पहिले प्लास्टिक व ई कचरा संकलन केंद्र तासवडेत
News By : कराड | संदीप चेणगे
![सातारा जिल्ह्यातील पहिले प्लास्टिक व ई कचरा संकलन केंद्र तासवडेत](https://emuktagiri.in/upload/post/777fbcb5e9.jpg)
तासवडे ता.कराड येथे ग्रामपंचायत स्तरावरील जिल्ह्यातील पहिल्या प्लास्टिक व ई कचरा संकलन केंद्राचे उदघाट्न नुकतेच जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) मा.अर्चना वाघमळे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी विजय माईनकर, जिल्हा परिषद साताराचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी विकास सावंत, कराड तालुका गटविकास अधिकारी मीना साळुंखे, संदीप दिक्षित , डी.एस.पोतदार, सरपंच सौ.भारती शिंदे , उपसरपंच सुभाष जाधव, ग्रामसेवक समाधान माने यांची प्रमुख उपस्थिती होती. http://www.emuktagiri.in/upload/post/696ff19715.jpg
तासवडे गावास नुकतीच जिल्हास्तरीय आर.आर.आबा पाटील सुंदर गाव स्मार्ट ग्राम स्पर्धेच्या तपासणी समितीने भेट दिली यावेळी सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या संकलन केंद्रात प्लास्टीक व ई-कचरा संकलन करण्यासाठी चार स्वतंत्र भाग करण्यात आले आहेत. गावातील प्लास्टिक व इलेक्ट्रिक आणी इलेक्ट्रॉनिक्स आदी घनकचरा घंटागाडीमध्ये न टाकता सदर केंद्रामध्ये जमा करायचा आहे. यामध्ये पहिल्या भागात दोन कंटेनर असून एकामध्ये प्लेन प्लास्टीक पिशवी (किराणा पिशवी), दुसर्या कंटेनरमध्ये प्रिंटेड पिशवी व रॅपर्स (बिस्किट पुडे, कुरकुरे, टुथपेस्ट etc.) , दुसऱ्या भागातील एका कंटेनरमध्ये पिण्याच्या मोकळ्या प्लास्टीक बॉटल व दुसर्या कंटेनरमध्ये इतर सर्वप्रकारच्या बॉटल उदा. मेडिकल,कोल्ड्रिंक्स, औषध बॉटल etc., तिसऱ्या भागातील पहिल्या कंटेनरमध्ये काचेचे बल्ब, ट्यूब तर दुसर्या कंटेनरमध्ये इतर इलेक्ट्रिक साहित्य आणी चौथ्या भागातील पहिल्या कंटेनरमध्ये सी. डी., मोबाईल्स, मोबाइल चार्जर, किबोर्ड, माऊस इ. व दुसर्या कंटेनरमध्ये इतर सर्व प्रकारचे इलेक्ट्रिक व ईलेक्ट्रॉनिक्स साहित्य. अशी सूक्ष्म विभागणी करण्यात आली आहे. तसेच गावात एकल वापराच्या प्लास्टीक वस्तूचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण आणि विक्री यावर शासनामार्फत बंदी करण्यात आली आहे. उल्लंघन करणार्यावर पहिल्या गुन्ह्यास रु. ५,०००/- दंड , दुसऱ्या गुन्हयास रु. १०,०००/- दंड आणी तिसरा गुन्हा असेल तर रु. २५,०००/- दंड व ३ महिन्याचा कारावास अशी जनजागृती करण्यात आली आहे. व दंड आकारणीस सुरवात करण्यात आली आहे. गावाला नुकतेच तालुका स्तरावरील स्मार्ट ग्राम म्हणून घोषित करण्यात आले असून 10 लक्ष रुपये पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे. याप्रसंगी जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ.अर्चना वाघमळे यांनी संबोधित करताना सदर प्रकल्प अभिनव आणी कल्पक असून हा प्रोजेक्ट संपूर्ण सातारा जिल्ह्यात दिशादर्शक व रोल मॉडेल ठरेल असे प्रतिपादन केले. स्वागत व प्रास्ताविक अमित जाधव यांनी केले तर आभार भीमराव खरात यांनी मानले. यावेळी माजी सरपंच राजेंद्र जाधव, विकास जाधव, लता जाधव ,संजय लिंबळे , सदस्य दिपाली जाधव, आश्विनी जाधव, मनीषा जाधव, निवास जाधव, बजरंग गुरव, लक्ष्मण जाधव, भगवान शिंदे, शहाजी जाधव, पांडुरंग शिंदे,सुनील जाधव, युवराज जाधव, संजय जाधव, सुधीर खरात, दामोदर खरात, संदीप जाधव, नितीन खरात, रजनीश खरात, आनंदा खरात, सचिन थोरात, शामराव जाधव, तानाजी पाटील आदी प्रमुख पदाधिकारी, शिक्षक वर्ग, विद्यार्थी, आरोग्य विभाग कर्मचारी आणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.