पृथ्वीराज चव्हाणांमुळे काँग्रेसची पिछेहाट आमचे सरकार असते ते तर आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिले असते, या पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर वक्तव्यार बोलताना विखे-पाटील म्हणाले, दुर्दैवाने महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पिछेहाट, वाताहातला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेच जबाबदार आहेत. त्यांच्यामुळेच आघाडीचे सरकार गेले आहे. त्यांनी सरकार घालवण्याचे काम केले आहे. त्यांची सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवणे यात काही तथ्य नाही.
कराड, दि. 27 ः मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक विचार करत असताना छगन भुजबळ राईचा पर्वत करत आहेत. त्यांनी आपली मुक्तातफळे उधळणे थांबवावे, असा सल्ला महसुलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आरक्षणा संदर्भात सत्ता गेल्यानंतर शहाणपण दाखवू नये असा टोला लागवला. कोल्हापूर येताना कराड येथे एका हॉटेलवर थांबले असताना पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. मंत्री विखे-पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर आहे. याबाबत कोणाच्याही मनात शंका असण्याचे कारण नाही. जरंगे-पाटील यांनाही आम्ही लेखी स्वरूपात आश्वासन दिले आहे. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आरक्षणावरून अशा प्रकारची वक्तव्ये करणे दुर्देव आहे. मराठा आरक्षण समाज आरक्षण मागतोय, तो त्यांचा अधिकर आहे, म्हणून मागतोय. सरकार त्यांच्यावर सकारात्क विचार करतोय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यानी स्पष्ट केलय आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही. विनाकरण राईचा पर्वत भुजबळ का करातयत आहेत माहिती नाही त्यांनी मुक्तफळे उधळणे थांबवावे. दुध दराबाबत सुरू असलेल्या आंदोलनाबात विचारले असता ते म्हणाले, दूधाला प्रति लिटर किमान 34 रुपये दर दिला पाहिजे. काही दूध संघ सरकारचा आदेश पाळत नाहीत अशा तक्रारी आहेत. महाराष्ट्रात सध्या 30 टक्के दुधात भेसळ आहे, हे थांबवणे गरजेचे आहे. दुधाच्या भावाबाबत खासगी दुध संघ ऐकणारे नसतील तर त्यांचे परवाने रद्द करावे लागतील, असे ते म्हणाले.