निढळमध्ये 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’

Published:Apr 21, 2021 09:58 AM | Updated:Apr 21, 2021 09:58 AM
News By : Muktagiri Web Team
निढळमध्ये 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’

शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने निढळमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायत कृती समितीने बुधवार, दि. 21 रात्री 8 वाजल्यापासून 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.