वीज कंपनीने शेतकरी व ग्राहकांची पिळवणूक थांबवावी

धर्मराज जगदाळे यांची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी
Published:5 y 1 m 1 d 5 hrs 30 min 18 sec ago | Updated:5 y 1 m 1 d 5 hrs 30 min 18 sec ago
News By : Muktagiri Web Team
वीज कंपनीने शेतकरी व ग्राहकांची पिळवणूक थांबवावी

‘वीज वितरण कंपनीकडून सध्या शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांकडून चुकीच्या पद्धतीने वसुली केली जात आहे. कंपनीने ही पिळवणूक तातडीने थांबवावी,’ अशी मागणी भूमाता शेतकरी संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मराज जगदाळे यांनी तहसीलदारांकडे निवेनाद्वारे केली आहे.