शेती व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसाय वाढवणे गरजेचे

हिम्मत देशमुख यांचे प्रतिपादन : गोसाव्याचीवाडी येथे शेतकर्‍यांना हरियाणातील दुधाळ म्हशींचे वाटप
Published:Feb 25, 2021 11:18 AM | Updated:Feb 25, 2021 11:18 AM
News By : Muktagiri Web Team
शेती व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसाय वाढवणे गरजेचे

‘सध्या हवामानातील बदलामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडत आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होत आहे. शिवाय शेतीमाल अल्प मोबदल्यात विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी शेती व्यवसायास पूरक समजला जाणारा दुग्ध व्यवसाय वाढवणे गरजेचे आहे. एकमेव दूध व्यवसाय असा आहे की, या व्यवसायात शेतकर्‍याला दर दहा दिवसांनी दुधाचा योग्य मोबदला मिळतो व यातून शेतकर्‍यांची शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचावला जाऊ शकतो,’ असे प्रतिपादन हिम्मत देशमुख यांनी केले.