कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गाव तेथे क्वारंटाईन सेंटरची उभारणी करणे गरजेचे 

जनार्दन कासार : प्रांतांकडून बुध गावची पाहणी
Published:4 y 10 m 1 d 19 hrs 4 min 55 sec ago | Updated:4 y 10 m 1 d 19 hrs 4 min 55 sec ago
News By : Muktagiri Web Team
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गाव तेथे क्वारंटाईन सेंटरची उभारणी करणे गरजेचे 

‘कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारणे आवश्यक आहे. गाव तेथे क्वारंटाईन सेंटरची उभारणी जिल्हा परिषद शाळा, हायस्कूलमध्ये केल्यास रुग्ण संख्या कमी करता येऊ शकते,’ असे मत परिविक्षाधिन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी व्यक्त केले.