‘जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानां’तर्गत सर्व उद्दिष्टे पूर्ण करावीत

संतोष धोत्रे यांचे आवाहन : माण पंचायत समितीत आढावा बैठक संपन्न
Published:Dec 12, 2020 01:32 PM | Updated:Dec 12, 2020 01:32 PM
News By : Muktagiri Web Team
‘जल जीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानां’तर्गत सर्व उद्दिष्टे पूर्ण करावीत

‘जल जीवन मिशन अंतर्गत माण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती अंतर्गत सर्व कुटुंबांना तसेच शासकीय कार्यालयांना नळजोडणी उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे. तसेच स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवीन वाढीव शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे,’ असे आवाहन जिल्हा परिषद साताराचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी केले.