‘जनता कर्फ्यू’मुळे उत्तर खटाव झाला शांत अन् नि:शब्द

बाजारपेठ, रस्त्यांवर शुकशुकाट; विनाकारण फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई
Published:Apr 24, 2021 12:28 PM | Updated:Apr 24, 2021 12:28 PM
News By : Muktagiri Web Team
‘जनता कर्फ्यू’मुळे उत्तर खटाव झाला शांत अन् नि:शब्द

शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने उत्तर खटावमधील खटाव, पुसेगाव, निढळ, बुध या बाजारपेठेच्या गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ज्या-त्या गावातील ग्रामस्तरीय दक्षता समितीने 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.