वर्धन ऍग्रो हा कारखाना महाराष्टातील अद्यावत कारखाना असून प्रत्येक वर्षी कारखाना गाळपात वाढ होत आहे पुढील हंगाम ऑगस्ट महिन्यात सुरु होणार असून जास्तीत जास्त ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून कारखाना व्यवस्थापन तयारी करत आहे त्यादृष्टीने येत्या आठवड्यात कारखाना कार्यस्थळावर ऊस तोडणी वाहतूक करारास सुरुवात होणार आहे तरी सर्व ऊस तोडणी वाहतूकदारानी आपापले करार करून कारखान्याला सहकार्य करावे. - विक्रमबाबा कदम कार्यकारी संचालक वर्धन ऍग्रो प्रो.लि.त्रिमली
वर्धन ऍग्रो कारखान्यास डिस्टीलरी प्रकल्प सुरू करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व शासकीय परवाने मिळाले असून 1 एप्रिल पासून 60000 लिटर क्षमतेच्या डिस्टीलरी प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे तसेच 3 मेगा वेट वीज निर्मिती प्रकल्प, सीएनजी प्रकल्प, खतनिर्मिती इत्यादी प्रकल्पांची सुरुवात ही लवकर होणारा असून आज सहाव्या गळीत हंगाम सांगता समारंभ प्रसंगी या गोष्टी सांगताना अभिमान वाटत आहे. गेल्या सहा वर्षात अनेक संकटावर मात करून कारखाना सुरळीत चालवण्यासाठी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार कारखान्याचे सर्व अधिकारी,कामगार वर्गाचे सहकार्य मिळाले आहे वरील सर्व प्रकल्प सुरू झाल्यावर दुष्काळी भागात एक प्रकारची औद्योगिक क्रांती घडून कार्यक्षेत्रातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे प्रतिपादन वर्धन ऍग्रो कारखान्याचे चेअरमन धैर्यशील कदम यांनी केले. त्रिमली घाटमाथा ता. खटाव येथील वर्धन ऍग्रो कारखान्याच्या सहाव्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते यावेळी वर्धन ऍग्रो कारखान्याचे जेष्ठ संचालक भीमराव काका पाटील, संपतराव माने, सत्वशील कदम,भीमराव डांगे,सुदाम दीक्षित, अविनाश साळुंखे, पृथ्वीराज निकम, संतोष घाडगे, सतीश सोलापुरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम,नागठाणे गावचे युवा नेते संतोष पाटील, माजी पं.स.सदस्य विकास राऊत, मोहितेवाडीचे युवा नेते महेश उबाळे आदी मान्यवरांसह कारखान्याचा अधिकारी वर्ग,ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, ऊस उत्पादक शेतकरी,ऊस तोडणी कामगार तसेच सर्व सभासद व कर्मचारी यांची उपस्थिती होती. धैर्यशील कदम पुढे म्हणाले यंदाच्या हंगामात 160 दिवस कारखाना सुरू राहिला कारखाना क्षमतेनुसार 1 लाख 75 हजार मेट्रिक टनाचे गाळप केले आहे साखरेचा उतारा ही सरासरी चांगला राहिला आहे पुढील हंगाम सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करणार आहोत कारखान्याच्या वतीने सुरू करण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांमुळे होणारा फायदा हा फक्त कारखान्यालाच होणार नाही तर येणारे उत्पन्न शेतकरी, ऊस तोडणी वाहतूकदारांना देखील मिळणार आहे माननीय सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांनी खांडसरी साखर कारखानाच्या बाबतीतील सरकारी धोरण बदलण्यासाठी नवीन कायदा होणार असल्याचे सांगितले असून त्याचा फायदा आपल्या कारखान्याला नक्कीच होईल अधिकारी कामगार वर्गाची देखील आम्ही सर्वतोपरी काळजी घेत असून पुढील हंगामाच्या सुरुवाती सर्वांची पगार वाढ केली जाईल त्यामुळे कामगार वर्गाने निश्चिन्त राहावे सप्टेंबर महिन्यात सुरू होणारा गळीत हंगाम पुढील वर्षी जून 2024 पर्यंत चालविण्यासाठी ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार कामगार यांनी सहकार्य करावे असे आवाहन धैर्यशील कदम यांनी केले याप्रसंगी भीमराव काका पाटील, संपतराव माने, संतोष पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमबाबा कदम यांनी केले, सूत्रसंचालन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत डूबल यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार सिव्हिल विभाग प्रमुख सुधीर कदम यांनी मांनले प्रारंभी सहावा गळीत हंगाम सन 2022-23 यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, ट्रॅक्टर चालक, कारखान्याच्या विविध विभागातील इतर कंत्राटदारांचा यथोचित सन्मान चेअरमन धैर्यशील कदम,संचालक मंडळ व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.