पर्यावरण टिकवण्यासाठी ‘झाडे लावा’ उपक्रम अग्रहक्काने राबवा ः डॉ. जाधव
News By : Muktagiri Web Team
सातारा, ः जागतिक पर्यावरण दिनाला संस्थापक रुप देणार्या संयुक्त राष्ट्रसंघाने पर्यावरण संरक्षणासाठी दहा वर्षाची निर्णायक लढाईची घोषणा करून प्रयत्नांची सार्थकता वाढवली आहे, ही सार्थकता वाढवयची असेल आणि पर्यावरण टिकवायचे असेल तर ‘झाडे लावा’ हा उपक्रम अग्रहक्काने राबवला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेशराव जाधव यांनी जागतिक पर्यावरण दिन व काँग्रेसच्या वतीने राबवण्यात येणार्या ‘शेतकरी स्वाभिमान दिनानिमित्त सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत बोलताना केले.
यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्हा काँग्रेसचे वतीने नागरिकांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते बाबासाहेब कदम, सरचिटणीस नरेश देसाई, अनु. जाती जमातीचे अध्यक्ष मनोजकुमार तपासे, महिलाध्यक्षा धनश्री महाडिक, अन्वर पाशा खान, नाना लोखंडे, अॅड. श्रीकांत चव्हाण, अॅड. दत्तात्रय धनावडे, नाजिम इनामदार, बाळासाहेब शिरसाट, मालन परळकर, प्रकाशराव फरांदे, संतोष डांगे उपस्थित होते.
यावेळी जाधव यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगताना म्हटले की, पर्यावरण हा पाच अक्षरांतच आहे पाणी, हवा, नद्या, वने, कृमिकीटक, डोंगरदर्या, आदींचा एकत्र समावेश असणार्या घटकांना भारतीय संस्कृती जपणारी आहे. पर्यावरण दिनाने जगाला संदेश दिला तर महाराष्ट्राने त्याला बळ देण्यासाठी वसुंधरा दिन हा नवा संदेश दिला, यामुळे आपले राज्य येत्या काही काळात पर्यावरनाचा समतोल राखण्यात यशस्वी होईल.
पर्यावरण व वसुंधरा दिनाचे औचित्य साधून जिल्हा काँग्रेस कमिटीचे आवारात झाडे लावून पर्यावरण दिन साजरा केला.